Friday 2 March 2018

महसूल प्रश्नोत्तरे- सुधारित आवृत्ती





महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते.  
      महसूल खात्यांत अनेक वेळा तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न‍ केला तर अनेक कायद्यााची पुस्तके चाळावी लागतात.अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी विविध प्रकारचे अभ्यासू व अनुभवी मार्गदर्शन करतांना, कायदेशीर तरतुदींवर अनेक उत्कृष्ठ लेख लिहिलेले आहेत. परंतु अशा लेखांतून नेमके उत्तर शोधणे काहीवेळा शक्य होत नाही.

        या गोष्टींचा विचार करून, तातडीच्या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्टीकोनातून "महसूल प्रश्नोत्तरे" ची रचना केलेली आहे. पहिल्या आवृत्ती मध्ये एकूण ३९१ प्रश्न होते सुधारित दुसऱ्या आवृत्तीमध्ये महसूल विषयक विभाग २४८ प्रश्न ,कुळकायदा विषयक विभाग ५१ प्रश्न,वारस विषयक ११० प्रश्न, न्यायदान विषयक ७६ प्रश्न असे एकूण ४८५ प्रश्न असे भाग करून प्रश्नांचे विविध संच, विषयनिहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रश्नांची उत्तरे देतांना, शक्य तिथे कायदेशीर तरतुदी, कायद्यातील कलम आणि न्यायालयीन आदेशांचा संदर्भ दिलेला आहे. यामुळे कायदेशीर अथवा न्या‍यालयीन निकालाचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.  

       "महसूल प्रश्नो्त्तरे" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल प्रश्नोत्तरे" मध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही विनंती.

हे पुस्तक प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

52 comments:

सरस्वती विद्या मंदिर वाळूज said...

Sir mazi sheti jamkhed talukyat aahe.maze vadil 4 years purvi varle talathyane varas nondisathi paise gheun adich varshani nond keli v nantar 6 mahinyapurvi mi tyach talathyala khatefod sathi arj v fess mhanun 25000 rs dile pan tyane khate fod keli nahi v mazi fasvnuk keli kay karawe plz margdarshan kara

Unknown said...

महोदय
भुमी अभिलेख कार्यालयात न्यायालयीन आदेशानुसार फेरफार घेऊन अभिलेखात नोंद करणेसाठी अर्ज केलेला आहे. सदर अर्जानुसार कार्यालयाने सरकारी वकीलांचा अभिप्राय सुध्दा मागविला आहे. सरकारी वकील साहेबांचे अभिप्रायानुसार नोंद घ्यायला पाहीजे पण कार्यालयाने सहधारकांना नमुना 9 अन्वये नोटीस पाठवायचे ठरविले आहे. माझा प्रश्न खालीलप्रमाणे आहे
१] न्यायालयीन आदेशाने अर्जदारास ताबा देण्यात आल्यानंतर सुध्दा सहधारकांना नमुना ९ अन्वये नोटीस देणे आवश्यक असते का?
२] न्यायालयीन आदेशाने नोंद घेण्याची भुमी अभिलेख कार्यालयाची पध्दत कशी असते.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

अमोल said...

सर मी अमोल मार्च महिन्यात 30 गुंठे जमीन खरेदी केली होती पण त्या 7/12 वर मयत व्यक्तीचे नाव तसेच होते त्या मुळे ती नोंद रद्द करण्यात आली नंतर मी वारस नोंद करून घेतली व नवीन नोंद करण्यासाठी नवीन index पण तलाठयाला दिली परंतू तो आता sub resiter परवानगी घ्यावी लागते म्हणतोय तर मला काय करावे लागेल process काय असेल

vinayak mahamunkar said...

सात बारावर मूळ खातेदाराचे नाव कमी दुस-याचे नाव दाखल झाले हाेते .तक्रार केल्यानंतर चुकीने लावण्यात आलेले नाव कमी न करता मूळ खातेदाराचे नाव कब्जेदार रकान्यात दाखल करून सुधारीत सातबारा दिला व साेबत पत्र दिले की हे सर्व चुकीने झाले हाेते.चुकून लागलेले मूळ नाव कमी झालेच नाही.मूळ मालकास मात्र कब्जेदार म्हणून दाखल केले .हे कितपत याेग्य आहे?

Unknown said...

सर बाजूच्या शेतकर्याची संमती नसेल तर शेतजमीनीची मोजणी होत नाही का.

Unknown said...

plz reply

Unknown said...

सर म. ज. म. अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये करावयाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती सांगा

Unknown said...

मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केला आहे संबंधित पक्षकार आदेशानुसार नोंद घेण्याबाबत। अर्ज दिला आहे याकरिता अपील चा कालावधी पूर्ण होऊ द्यावे लागेल काय

Mohsin shaikh said...

हो आदेशात नमूद केले असेल तर थांबावे लागेल

Mohsin shaikh said...

ब्लॉग वरील लेख वाचावा

Mohsin shaikh said...

नोटीस काढून संधी दिली जाते उपस्थित न राहिल्यास त्यांचे संमती विना मोजणी केली जाऊ शकते

Anonymous said...

sir, maji 62 guntha chi jamin hoti. 16 gunthe vikli geli hoti pan tyacha var court case kela aahe ani 46 gunte maja navavar aahe. parntu 46 gunthe var canal chi nondh zaleli aahe. canal physical tyachvar aaheh nai. tar me kay karu. nondh kadhyna sathi me kay karu.

Mohsin shaikh said...

कॅनॉल ची नोंद झालेला फेरफार काढावा व त्यानुसार त्यातील संपादन संबंधी कागदपत्रे भूसंपादन कार्यालयातून काढून घ्या व त्या कार्यालयात चौकशी करावी.

Anonymous said...

above continue...

canal che ferfar tehsildar office madhe dakhvlya nantar tehsildar ne mojni karayala sangitla aahe. vikla gelela 16 guntha var court case aahe tar ami 62 guntha che mojni karav sakto ka?
FYI jamin madhe 8 gut aahe tyatla 1 gut aamcha 62 guntha cha hota ani 16 gunthe purvi khota papers base var vikla gela aahe ani techa court case kela aahe.

Unknown said...

9422450846

Unknown said...

आस्थापना बाबत ची माहिती हवी आहे

Unknown said...

पोट हिस्सा कार्यवाही करीता संमती आवश्यक आहे हद्द कायम मोजणी मध्ये आवश्यकता नाही

विजय करदेकर said...

सर आमच्यए मामाची जागा आहे त्यमद्धे त्यांच्या आत्यांची नाव आहेत पण त्या मयत आहेत त्यवेळी माझ्या आजोबांनी त्यांना आपला हिस्सा देण्यात आला होता तो त्यांनी विकला आहे आता त्या आत्याचे नातू या जागेत नाव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत आमचे मामा ही आता राहिले नाहीत त्यंचा एक लहण मुलगा आहे 8 वर्षाचा व पाच बहिणी आहेत पाची बहीणींची 7/12 मध्ये नाव आहेत तलठ्याने केस प्रांता कडे पाठवली आहे 21/02/2012 ला एक तारीख झाली , दुसरी तारीख 14 ला आहे
तर त्या व्यक्तीचे नाव लागू नये यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

Sir ssd exam link please .
2 March pasun amachi ssd exam she.Abhijeet Joshi talathi

Unknown said...

Your mobile no please

Unknown said...

सर मी प्रकाश वाडकर
आमची जमीन 1973 मधे धोम धरण प्रकल्पअंतर्गत गेली आहे त्यवेळी एकत्र कुटूब एकोम्या मधे मोटे चुलते यानी एकट्या नेच घेतली आहे त्याविषयी आपले मार्गदर्शन पाहिजे होते
मजा नम्बर 9870719165

patil said...
This comment has been removed by the author.
Abhay Jagtap said...

सर महाराष्ट्र जमीन अधिनियम1966 कलम 59 केसेस तहसीलदार यांना अधिकार आहेत का?

Unknown said...

देवस्थान ईनाम जुडी व नुकसान वसुली बाबत

Nitin kadam said...

महोदय हिब्बानामा प्रमाणे सातबारा उताऱ्यावर फेरफार घेता येतो का याबाबत आपल्याकडे महाराष्ट्र शासन परिपत्रक आहे का

Nitin kadam said...

साहेब माझे नावे असणारे क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्र नदीमध्ये गेले आहे व त्यामधून आज रोजी नदीच्या पाण्याचा प्रवाह आहे तरी या बद्दल मला काय शासनाच्या पुनर्वसन खात्याकडून भरपाई किंवा प्रकल्प ग्रस्त दाखला भेटेल का

Unknown said...

कोर्टाने रस्त्याच्या वादाचा निकाल दिलेला आहे. उताऱ्यावर रस्त्याची नोंद होण्यासाठी तलाठी तहसिलदार यांचेकडील आदेश मागत आहे. त्याची खरंच गरज आहे काय?

Unknown said...

Sir कोणत्याही वर्ग1 जमिनीस अथवा कुळ कायदाच्या 84 क भंग झालेल्या जमिनीस कबजे गहाण जमीन ठेवणेसाठी कु का कलम 63 अ ब नुसार परवानगी देता येईल का मार्गदर्शन करावे

सतीश पाटील said...

सर, संपादन मंडळाने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांचेमार्फत भूसंपादन प्रस्ताव प्रस्तावित केला होता पण तो कलम चार व कलम सहा नुसार चावडीवर दि. 13/02/2001 रोजी प्रसिद्ध झाला.कलम 9 (3) 9 (4)नोटीस दि. 10/01/2001 रोजी काढणेत आलेली आहे. प्रारूप निवाडा दि. -/01/2004 रोजी झालेला आहे.
परंतू प्रस्तुत भूसंपादन प्रस्तावाचा कलम 4 च्या नोटिसीपासून 3 वर्षाचे आत अंतिम निवाडा न झालेने व्यपगत झालेला आहे
प्रस्तुत व्यपगत प्रस्तावात नव्याने कलम 4 काढनेस परवानगी मिळणेबाबत जिल्हाधिकारी, भूसंपादन समन्वय यांना दि.11/10/2004 रोजीच्या पत्राने परवानगी मागणेत आलेली होती परंतू अद्यापी परवानगी दिलेली नाही.
सातबारावरती 'तबदिलीस मनाई ' हा शेरा इतर हक्कात ठेवला आहे. व सातबारावर चुलते, आई,बहिणी यांची आणेवारी आहे.
मला हक्कसोड पत्र व वाटणीपत्र करायचे आहे. परंतू तबदिलीस मनाई हा शेरा अडचणीचा ठरत आहे तो शेरा कमी करता येईल का? किंवा हक्कसोड पत्र व वाटणीपत्र करण्यासाठी परवानगी मिळेल का? किंवा ह्या संदर्भात आपण काय सुचवाल.

Unknown said...

सर माझ्या कडे तिस वषाॅ पासून जमिन कब्जात आहे. लिमिटेशन कायदा व सुप्रीम कोर्टाच्या हवाला देत ति शेती माझया नावाने होईल का

Anonymous said...

मी मुंबईत रहातो. सख्खे काका जे गांवी असायचे ते आता मयत झाले आहेत. आमचा एक वारशी (सारखे आडनाव) ज्याचे आमच्या बाजूला असलेल्या ५.५ गुंठा जमीनीत घर आहे. आमच्या आणि त्याच्या जमीनीचा सर्व्हे नंबर ही वेग वेगळा आहे. आमच्या जमीनीत असलेल्या १०० वर्षा पूर्विच्या विहीरीचे पाणी पंप लावून काढतो. आमचा पंप काढून फेकून देतो. मध्यंतरी सदर विहीर आम्ही दुरुस्त करतांना बरेच अडथळे आणले होते. जेसीबी चालकाला, गवंड्यांना धमकावण्याचे प्रकारही त्यांने केले होते. तहसीलदारांनी त्याला रहाटाने पाणी काढण्याची परवानगी दिली तरी हा रात्री किंवा भल्या पहाटे पाणी काढत असतो. आता तर त्याने माझ्या वडीलांनी ६० वर्षापूर्वी घेतलेल्या जमीनीची दुरुस्ती करण्यास लागणारे सामान उतरविण्यास संबंधित थेकेदारांना धमकविण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक असल्यामुळे पोलीस पाटील, सरपंच तसेच पोलीस स्टेशनमधील ओळखीचा त्याला फायदा मिळतो. जमीन एकत्री करणात त्यांची ५.५ गुंठे जागा असताना त्याला २० गुंठे जागा पाहिजे म्हणून ६ वर्षापूर्वी त्याने केस टाकलेली आहे. आम्ही सर्व पुरावे कोर्टात सादर केले आहेत. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. केसमध्ये दम नसताना दोन्ही बाजूचे वकील व कोर्ट एवढा वेळ का घेत आहेत हा प्रश्न पडतो.
तरी सदर व्यक्तीचा कसा बंदोबस्त करावा याबाबत मला अचूक मार्गदर्शन करावा. मला माझ्या जमीनीतून गेलेला वहाळ दुरुस्त करायचा आहे. पावसाळ्यात खाडी / समुद्राच पाणी आत येत असल्याने आंबा बागायतीचे नुकसान होत आहे. वहाळ दुरुस्त झाल्यास इतर लागवडही मला करता येईल. क्रुपया आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.

Unknown said...

साहेब,माझ्या पणजोबांच्या जमिनिपैकी एक तुकडा जो माझ्या आजोबांकडे होता वहिवाट त्यांचीच होती व अनेक वर्षे तेच कसत होते,पण 7/12 आजोबांच्या नावावर नव्हता,,काही वर्षपूर्वी तो तुकडा माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर ,,सख्या काकांनी 7/12 त्यांच्या नावावर करून घेतला,तर त्या जमिनीमध्ये माझ्या वडिलांना हिस्सा मिळेल का? काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे.

Unknown said...

Sir शेती प्रयोजनासाठी सन 1956 ला कबजेहक्क ची रक्कम 243 भरणेचे अटीवर प्रांत अधिकारी यांनी एक इसमाला land grant केली परंतु संबंधित इसमाने कबजेहक्क रक्कम अद्याप भरली नाही व त्या व्यक्ती चे नाव ही 7/12 ला नोंद नाही परंतु जमीन संबंधित इसमाच्या ताब्यात आहे तर आता त्या इसमाचे नाव 7/12 ला लावता येईल काय व कबजेहक्काची रक्कम कशी भरून घयावी याबाबत मार्गदर्शन करावे pls
ते अधिकार tahsildar यांना आहेत की नाही याबाबत पण मार्गदर्शन व्हावे

Sarkar79284 said...

सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावी

shaikhbabarm@gmail.com said...

भोगवटादार वर्ग 2 च्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेती विषयक कर्ज मिळू शकेल काय?

Unknown said...

सर पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन वर्ग1 ची आहे व मिळालेली जमीन वर्ग 2 ची आहे सदर जमिनीची कबजेहक्क रक्कम अजून भरलेली नाही व मिळालेल्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करणेचे आहे तर 4 जून 2019 चे gr नुसार कबजेहक्क रक्कम भरून घ्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन मिळावे

Unknown said...

Sir पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन भोगवटा वर्ग 1 ची असेल व वाटप जमीन वर्ग 2 ची आहे व तिचे कबजेहक्क रक्कम अद्याप भरली नाही तर तिचे 4 जून 2019 चे gr नुसार वर्ग 1 मध्ये रूपांतर करताना कबजेहक्क रक्कम भरून घ्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन मिळावे

Bhagwant vitthal gohad said...

सर वर्ग२च्या जमिनीचे खरेदीखत होईल का

Unknown said...

कुळ कायदा कलम 63 चे नोटीस पात्र हा शेरा कमी करणेसाठी काय करावे लागेल

Unknown said...

भो.व.2 पाटील इनाम-रजिस्टर खरेदी दस्त आहे.फेरफार केला आहे.हितसंबंध नसतानाही गावातील इतर लोकांनी हरकत घेतली आहे.हरकत दाखल करून घ्यावी किंवा काय करावे जरा मार्गदर्शन करावे🙏

Unknown said...

Sir majya vadilanchi ekun jamin 12 eker hoti parntu ti satbaryavr 10 ekarch hoti sarv jamin vikri keli nantr vikri kelekya mansane jamin mojali ti 12 ekar nighali atta ti 2 ekar jamin kashi ghyachi
Amchya kade 12 ekarachi kharedi ahe but tyachi procedure kay ahe...

Krushna Shinde said...

सर
माझ्या आजीने 1993 सली तहसीलदार यांना अर्ज देऊन माझ्या वडिलांच्या नावे जमीन करण्यास सांगितले होते त्यावर तहसीलदार यांनी तलाठी यांना हुकुम केला तलाठी यांनी नोंद केली परंतु माझी आजी ने त्याच गटातील 8 आणे हिस्सा दुसऱ्या व्यक्तीला विक्री केला होता त्या नोंदिला वडिलांनी तक्रार दिली होती ती तक्रार सुरू असताना वडिलांची नोंद घेतली म्हणून मंडळ अधिकारी यांनी याच गटातील फेर नं २४९ तक्रारी असल्याने सदर फेर नं २७६ रद्द २४९ नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी असा शेरा मारून रद्द केली परंतु तलाठी यांनी अद्याप पर्यंत फेर नोंद केली नाही आणि आता माझी आजी मयत आहे तिला 3 मुले 5 मुली आहेत इतरांना या पूर्वी जमीन दिली आहे तर आता माझ्या वडिलानी काय करावे मार्गदर्शन द्या प्लीज

Sarkar79284 said...

सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावी

Sarkar79284 said...

सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावी

Unknown said...

आम्हच्या १ हे १ आर शेतजमीनीपैकी १८ आर क्षेत्र रस्त्यासाठी भुसंपादन झाले आहे तर माझे कुटुंबास प्रकल्पग्रस्त म्हणुन दाखला मिळेल का ? (१९८६)

Vishal Jadhav 9225858652 said...

सर मि मयत तलाठी यांचा मुलगा असुन माहीती साठी आपला मोबाईल फोन नंबर हवाय

kasim said...

Sir sdo sahebanni adeshat total 10 survey no. Evaji 13 survey no. Lihile va mandal adhikari yanni 13 survey nos cha taba ghetla. Mulaat addl com. Sahebani faqt 10 survey no. Cha taba ghenya che adeshit kele ahe. Sadar chok kashi durust karta yeyeel. Plz guide me

kasim said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

निमताना मोजणी अर्ज सादर करण्याचा कालावधी किती दिवसांचा असतो

Unknown said...

सर वाहनांना माती वाहतुकीचा परवाना असताना व सदर वाहने खाली असताना देखील अवैध गौण खनिज वा चुकीच्या आरोपाखाली जप्त केले आहेत सदर कारवाई कायदेशीर योग्य असू शकते काय

Anonymous said...

Sir majhya वडलाच्य VA माझे चुलते यांच्या नावावर 1 हेक्टर शेतजमीन सामाईक होती, त्यात माझे वडील नंबरदार होते.
माझे वडील आता वारले , आमच्या घरात ४ व्यक्ती आहेत 1 मी 2 आई 3 माझी मोठी बहिण 4 माझी लहान बहीण .
तर वारस हक्काने आता नंबर दार कोण होणार ?
माझे चुलते होणार की मी होणार का माझी आई होणार

Dilawarkhan Pathan said...

Mohsin Shaikh saheb aaple Mahsul prashna uttare pustak vikri sathi available aahe ka..